कल्याण दि.10 जून :
गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सलूनची दुकाने बंदच आहेत. इतर दुकानांप्रमाणे आम्हालाही दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी कल्याण आणि आसपासच्या परिसरातील नाभिक व्यवसायिकांतर्फे कल्याण तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. श्रीसंत सेना महाराज नाभिक समाज मंडळ, आंबिवलीच्या वतीने निवेदन देण्यात आले. गेल्या 80 दिवसापासून सलून व्यावसायिक उपासमारीचा सामना करत आहेत. सर्व स्तरातील लोकं त्यांना घरी सेवा करण्यास बोलावत आहेत. दुकाने बंद असूनही विजवितरण कंपनीने बिलं दिली आहेत. शासनाने सलून व्यावसायिकांचा विचार करून अटी आणि शर्थीवर दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी या आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
यावेळी अनिल पंडित, (कोकण विभाग उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), मा. निर्मला कदम, (राष्ट्रीय OBC ब्रिगेड महिला अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, भाजपा पदाधिकारी) भाऊसाहेब शिंदे, ठाणे जिल्हा अध्यक्ष,( ग्रामीण),
प्रकाश सुरेश खराडे, अध्यक्ष संत सेना नाभिक मंडळ, आंबिवली, मोहन परियार उपाध्यक्ष, रमझान हजाम, निरंजन शिंदे, नितीन शिंदे, मयूर परियार, अमोल शिंदे, अरुण भाटी, महेंद्र भाटी, पप्पू भाटी, सलमान मलिक, इत्यादी नाभिक बांधव उपस्थित होते.