कल्याण दि.3 जून :
कल्याण परिमंडळात निसर्ग चक्रीवादळासह झालेल्या पावसाने विविध भागात वीजपुरवठा बाधित झाला.
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे विजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला होता. तर
याशिवाय झाडाच्या फांद्या विजवाहक तारांवर पडल्याने आणि वाऱ्यामुळे विजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बाधित झाला.
*कल्याण मंडल एक*
कल्याण पश्चिममधील बारावे, रामबाग, शिवाजी चौक, रहेजा, कल्याण पूर्वमधील वालधुनी, ठाकुर्ली, काटे मानिवली, चिंचपाडा, डोंबिवलीतील कोपर रोड, नांदीवली, आजदे, नवपाडा भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बुधवारी दुपारी तेजश्री फीडर बंद ठेवण्यात आला होता.
*कल्याण मंडल दोन*
बदलापूर, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ याठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
*वसई मंडल*
वाड्यातील कांही भाग व अर्नाळा परिसरात वीजपुरवठा बाधित झाला होता.
*पालघर मंडल*
पालघर मंडलात वीजपुरवठा सुरळीत आहे.
मंगळवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसात फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदाराचे कामगार अहोरात्र काम करीत आहेत. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्यासह अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते स्वतः फिल्डवर आहेत. नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन विजेचे नवीन खांब, केबल व अत्यावश्यक साहित्य तयार ठेवण्यात आले आहे. आपत्तीच्या काळात महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.