कुठे गेले ते दिवस !!!!
जेव्हा रात्रि गजर लावूनही
ऑफिसला उशिरा जायचो ,
बॉसचा मूड बघत
चोर पावलानि आत शिरायचो !
सकाळचा चहा
कसा दिवसाला अर्थ दयायचा ,
जगण्याच्या धावपळीत
एक क्षण निवांत असायचा !
ट्रैन चा ग्रुप सुद्धा
सुन्दर जमुन आलेला ,
निखळ मैत्रीचा त्याने
ओलावा जपलेला !
सुख म्हणजे नेमके काय असते
ते शनिवार आला की कळायच ,
कष्टांच चीज करायला
मग डेस्टिनेशन शोधायचा !
लोक म्हणतात
मुंबई कधी थांबत नाही ,
अहो, आम्हास विचार ,
आम्ही तिला थाम्बु देत नाही !
पण आज नजर लागली
आमचीच या शहराला ,
जसे काही झाड मुकले
वसंताच्या बहराला !
माझा कड़े वेळ नाही
हे सबब खोट असत,
खरच वेळ मिळाल्यावर
त्याच दडपण मोठ असत!
मला वाटे श्वास माझा
शिंपल्यातला मोती होता ,
आज़ मात्र काळून चुकल
पानावरचा दवबींदू छोटा !
–नम्रता जगताप सिंग