कल्याण दि.14 जून :
Mission Begin Again अंतर्गत महापालिका क्षेत्रात ५ जूनपासून सम- विषम तारखेप्रमाणे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुकानांमध्ये खरेदी करताना नागरिक/ग्राहकांकडून social distancing पाळले जात नसल्याचे दिसत असून ही निश्चितच चिंताजनक बाब आहे.
त्यामूळे ग्राहकांना दुकानात प्रवेश देतांना महापालिकेच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनीदेखील आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, तसेच 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांनीही घराबाहेर न जाण्याचे आवाहन महापौर विनिता विश्वनाथ राणे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
दरम्यान कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण भरमसाठ संख्येने वाढत असले तरी लोकांमध्ये अद्यापही गांभिर्य दिसत नाहीये. ज्यामुळे हे सर्व नियम, सोशल डिस्टन्स पाळणाऱ्या लोकांच्या मेहनतीवर पाणी फिरू शकते.
*#Palava News*
*#LocalNewsNetwork*