कल्याण दि.1 जून:
बालभिकारीमुक्त भारत करण्याचे स्वप्न उराशी घेऊन चिरंजीवी संघटनेने लढा सुरू केलाय.त्या बालकांना ही खेळायला,शिकायला आणि त्यांचं बालपण जगायला मिळावं यासाठी हा लढा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुकारला आहे.यासाठीच बालभीकरी जाणीव जागृती अभियान ही मोहीम सुरू केलेआहे. ‘आपण बालभीकाऱ्यांना भीक देऊ नये’ हा संदेश देण्यासाठी आणि याची जनजागृती करण्यासाठी संघटनेच्या राज्यध्यक्षा सलोनी तोडकरी वेगवेगळ्या विभागात जाऊन उपोषण करतात. या मोहिमेची सुरुवात डिसेंबर 2019 मध्ये करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक सोमवारी हे उपोषण जनजागृतीसाठी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज 1 जून 2020 रोजी 22 वे उपोषण मैत्रकुल जीवन विकास केंद्र येथील शांतीभवन येथे पार पडले. या उपोषणाची सुरुवात करण्यासाठी विद्यार्थी भारती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तेजस भोसले आणि उपोषणाचा समारोप करण्यासाठी मैत्रकूलच्या कल्पतरू ज्योती निकाळजे या प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या.
त्याचबरोबर यामध्ये एक पुस्तक वाचनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.यामध्ये श्यामची आई या पुस्तकातील रात्र चौथी याचे वाचन झाले.आताच्या तरुणांनी आधुनिकतेसोबतच वाचनाला ही महत्व द्यायला हवं हा संदेश दिला. कोरोनाच्या या परिस्थितीत लॉकडाऊनमुळे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता हे उपोषण पार पडले असल्याचे संघटनेच्या सदस्य श्वेता पाटील यांनी सांगितले.
हा लॉकडाऊनचा काळ आपण आपल्या स्वतःच्या परिवाराला देऊयात. आपल्या मुलांसोबत,आपल्या भावा-बहिणी सोबत,आपल्या आजी-आजोबांसोबत घालवावा.तसेच घरात असताना फक्त मोबाईलमध्ये वेळ न घालवता पुस्तक वाचन,चर्चा किंवा वैचारिक खेळ यामध्ये आपला क्वालिटेटिव्ह वेळ स्वतःसाठी वापरावा.आपली मूलांच्या चेहऱ्यावर आनंद आणूया आणि त्यासाठी प्रयत्न करूयात असे आवाहन सलोनी तोडकरी यांनी केले.
त्याचबरोबर घरी बसून राहण्यापेक्षा चिरंजीवीने मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. यातील काही निवडक चित्र निवडून त्यातून नंबर काढण्यात आले.आणि त्या बेस्ट चित्रांना चिरंजीवी संघटनेच्या फेसबुक पेज वर टाकण्यात आले.अनेक लहान मुलांनी यात भाग घेतला.त्यांच्या प्रयत्नांना सलाम.
त्याचबरोबर लॉकडाऊनचा काळ उलटून जाईपर्यंत हे उपोषण मैत्रकूल जीवन विकास केंद्र येथील शांतिभावन येथेच होणार असुन ही मोहीम अश्याच पध्दतीने आणखी विस्तारली जाणार आहे. पूर्ण भारतभर आपण ही मोहीम घेऊन जाणार असून आपण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने सोशल मीडियावर याचा प्रचार करावा असे आवाहन संघटनेचे राज्याप्रवक्त राहुल बनसोडे यांनी केले आहे.